Home Eknath Shinde

Tag: Eknath Shinde

Post
राजपूत समाजापुढील 'भामटा' हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद, 15 मे (हिं.स.) : सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह...

Post
मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - मुख्यमंत्री

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव – मुख्यमंत्री

मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी...

Post
मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई, 14 मे (हिं.स.) – मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेत दिली. तसेच हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे लक्ष असून ते केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष...

Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी उद्या, गुरुवारी 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधिन आहे. याप्रकरणी गुरुवारी सकाळच्या सत्रात निकाल लागू शकतो असे संकेत खुद्द सरन्यायमूर्तींनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या...

Post
तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय - मुख्यमंत्री

तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय – मुख्यमंत्री

मुंबई, 5 मे (हिं.स.) : ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा...

Post
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

मुंबई, 1 मे (हिं.स.) : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Post
२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात - बावनकुळे

२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात – बावनकुळे

नागपूर, २७ एप्रिल (हिं.स.) : २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते. बावनकुळे यांनी यावेळी...

Post
जी-२० च्या निमित्ताने ठाण्यात सी-२० चे आयोजन

जी-२० च्या निमित्ताने ठाण्यात सी-२० चे आयोजन

ठाणे, 25 एप्रिल (हिं.स.) भारत सध्या जी-२० परिषदेचे यजमान पद भुषवत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित होत असताना ठाण्यात देखील जी-२० च्या पार्श्वभुमीवर सी -२० च्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विविधता समावेशीकरण आणि परस्पर सन्मान हे सुत्र डोळयासमोर ठेवुन जी-२० चे उदिष्ट ठरविले पाहिजे. हा संदेश लक्षात घेऊन भारताच्या यजमान पदाच्या काळात...

Post
दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे, 22 एप्रिल, (हिं.स.) कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी या आधी करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेकांनी नाराजी...

Post
मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे...