मुंबई, ३० मे, (हिं.स) : आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणा-या त्रासामुळे लोकांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनाधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात कुर्ला (पश्चीम) एल वॉर्ड येथे...
FlashNews:
Promoting Illegal Gambling Platforms: Actor Urvashi Rautela Faces Scrutiny!
Supreme Court Revives Petition Seeking Ban on Opinion Trading Apps
28% GST Case: Exchange22 gets Relief; Allahabad HC Stays ₹253 Crore Show Cause Notice
Explained: Why BJP is likely to lose Nalasopara Constituency – 132!
Digital Democracy Dialogue conclave 2024
Elegance Meets Sustainability: The Event Designer’s Journey to Eco-Friendly Luxury Weddings
Insider View – Exclusive Interview with Mr. Neelakantha Bhanu
Neha Khilnani, Founder and CEO – Connekting Dots
Navigating the dynamics of a lifestyle PR Agency in India:An Insider’s Perspective
Maharashtra Assembly Elections:A Festive Battleground
Maharashtra Assembly Elections- September 2024
GOA ASSEMBLY : MONSOON SESSION 2024
Interview with swapnil khatal
Swachh Bharat Abhiyan @ Pilerne (Saulem) Lake
Landslides on National Highway 66 BJP Contractor!
Need of the Hour : Creation of Tiger Reserve in Goa!
HINDU TEMPLE REJUVENATION PROJECT : WAIT JUST GETS A BIT LONGER!
2 MONTHS AND COUNTING….! INFORMATION DENIED BY HEALTH DEPARTMENT OF GOA!
Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
Region: Mumbai
मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले – निर्मला सीतारमण
मुंबई, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत...
केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी – पी. चिदंम्बरम
मुंबई, 29 मे (हिं.स.) : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही...
महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक – नाना पटोले
मुंबई, 29 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले...
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री
मुंबई, 28 मे (हिं.स.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर...
राजकीय गटातटाच्या वादात विकासकामे अडकली
डोंबिवली, २८ मे, (हिं.स) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून तलावाच्या विकास कामच भूमिपूजन झालं होतं. खासदार निधी, आमदार निधी, महापालिकेचा निधी, नगरसेवक निधी असा सुमारे करोडो रुपयांचा निधी या विकासकामासाठी खर्ची होणार होता. पण या कामाच्यामध्ये राजकिय हेवेदावे आले आणि हे काम अडकून पडलं आहे. दशक्रिया विधीसाठी दुसरी जागा नाही....
‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्रग्रंथाचा ३० मे रोजी होणार प्रकाशन सोहळा
ठाणे, 28 मे (हिं.स.) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी, ३० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक...
रामदास आठवले यांनी घेतला राज्य सामाजिक न्याय विभागाचा आढावा… सिद्धार्थ विहार वसतिगृह पुन्हा नव्याने सुसज्ज उभे करण्यासाठी 78 कोटींच्या निधीची तरतूद
मुंबई, 26 मे (हिं.स.) – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे; सहसचिव दिनेश डिंगळे आदी शासकीय अधिकारी मान्यवर उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीच्या अनेक स्थित्यंतराचे ऐतिहासिक...
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा – सुधीर मुनगंटीवार
मुंबई, 26 मे, (हिं.स) : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले....
संसदेच्या नूतनवास्तू उद्घाटनावर बहिष्कार ही विरोधी पक्षांची कृती वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक – राहुल नार्वेकर
मुंबई, 25 मे (हिं.स.) : लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या भारतीय संसदेच्या नूतनवास्तूचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी म्हणजेच २८ मे, २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उदघाटन होत आहे, ही अत्यंत अभिमानाची घटना आहे. मात्र या ऐतिहासिक समारंभावर बहिष्कार घालण्याची काही विरोधी पक्षांची कृती ही अत्यंत गैर आणि त्यांच्यातील वैफल्यग्रस्ततेची निदर्शक आहे, असे...