सिंगापूर, 1 जून (हिं.स.) : परस्पर आणि जागतिक समृद्धीसाठी भारत आणि सिंगापूर सारखे नैसर्गिक सहयोगी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. त्यां च्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याचा बुधवारी समारोप झाला. भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात...
FlashNews:
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Temple of Hindu Deity Lord Narayan Dev in ruins!
All India Hindu Rashtra Convention – 24 – 30 June,2024 @ Goa!
PM Modi Arrives In Srinagar, Attends Programme At SKICC
Baramulla Encounter: Two Pakistani Terrorists Killed in Jammu and Kashmir
A Dozen plus temples, Schools, Local Jobs, Private Properties, Water Bodies, Houses, entire village: All Auctioned for Mining in Goa!
‘Nayi Soch Ki Sawaari’: Electric Mobility in Delhi new mantra for Delhi
Deadly Eid-Ul-Azha Eve: Roadside Blast In Central Kurram Kills Four, Security Forces Eliminate Five Terrorists.
EVM Hacking again becomes an issue on social media, debate hots up after Musk tweet
Goan Temple Restoration Project: Wait just gets a bit longer!
Dashbord Design: Considerations and Best Practices for MSME’s
Leading from the front: India’s Green Credit Program
Gaming Through Time Console Evolution
Wisdom of the Ages: Pune’s Educational Legacy
3ioNetra : Temple Management Platform
Category: राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया
अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री
अहमदनगर, 31 मे (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महसुल, पशु संवर्धन व दुग्ध...
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री
अहमदनगर, 31 मे (हिं.स.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी ता.जामखेड येथे पुण्यश्लोक...
महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई, 31 मे (हिं.स.) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची...
शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा – नाना पटोले
मुंबई, 31 मे (हिं.स.) केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत....
मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले – निर्मला सीतारमण
मुंबई, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत...
केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी – पी. चिदंम्बरम
मुंबई, 29 मे (हिं.स.) : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही...
महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक – नाना पटोले
मुंबई, 29 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले...
भारत विश्वगुरु आणि महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतियाचा सहभाग आवश्यक ! – मंत्री गोविंद गावडे
पणजी, 29 मे (हिं.स.) – ‘जी-२०’ राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताला लाभणे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. भारताने विश्वाला योग, आयुर्वेद आदी दिलेली देणगी आहे. भारताला संगीत, नृत्य, कला, साहित्य, चित्र, शिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याची सर्वांसोबत आदानप्रदान होणे आवश्यक आहे. भारत हा आता केवळ विकसनशील देश नव्हे, तर विकसित आणि महासत्ता म्हणून विश्वात उदयास...
तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल @RTErdogan यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे.” हिंदुस्थान समाचार