Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे - राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)

सामान्यजनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन महसूलमंत्री विखेपाटील यांनी केले.

जिल्हाधिकारीbकार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारीयांच्या समन्वय बैठकीतते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमारपाण्डेय, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, शिरीष बोराळकर, संजय किनीकर तसेच विविध पदधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री म्हणाले शासकीय योजना सामन्यजनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडण्यासाठी पदाधिकारी काम करत असतात. हे काम करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास शासकीय योजना तळागाळातील सामान्यजनतेपर्यंत पोहचतील असेही ते म्हणाले.

शासन आपल्यादारी हे अभियानय शस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विविध योजनेचा लाभपात्रलाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उपविभागीय अधिकारीयांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारीयांची बैठक घ्यावी असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार हरिभाऊबागडे, प्रशांत बंब तसेच शिरीष बोराळकर, संजय किनीकर आणि इतर पदधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्यासूचनांची दखल घेऊन त्यावरतातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.