Home मराठी बातम्या शेती उद्योग रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

चंद्रपूर 24 मे (हिं.स.)- माजीमंत्री आ. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली असून रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा याकरिता आधारभूत धान खरेदी व त्यावरील बोनस असा दुहेरी लाभ देण्यात येत होता. मात्र त्यानंतरच्या काळात आधारभूत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था व उपअभिकर्ता यांना नियमान्वये लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अखेर सहकारी संस्था व उपअभिकर्ता यांनी आधारभूत धान खरेदी बंद करण्यात येत असल्याबाबतचे निवेदन राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना दिले. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता सकारात्मक चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकर आदेश काढणार असल्याची प्रतिक्रिया दिल्याने रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळले.

विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात. धान पीक घेताना मशागत व लागवडी खर्च अधिक असतानाही धानाला रास्त भाव मिळत नाही. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची असून शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र व उपअभिकर्तांना प्रती क्विंटल मागे अर्धा किलो तूट, संस्थेचे दहा लक्ष रुपये अनामत भरणे, तसेच ५० लक्ष रुपयांची बँक गॅरंटी अशा जाचक अटींच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा आधारभूत धान खरेदी संघटनेने आवाज उचलत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांना निवेदनातून जाचक अटी शिथिल करण्यासंबंधी मागणी घातली. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र द्वारे धान खरेदी होणार नसल्याचेही निवेदनातून व्यथा व्यक्त केली. आधारभूत दान खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी न केल्यास यातून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल व शेतकरी पूर्णतः उध्वस्त होणार असा दूर दृष्टिकोनातून विचार करून माजी मंत्री वडेट्टीवार यांनी मुंबई गाठून राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विदर्भातील दान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांची समक्ष मांडल्या.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.