नवी दिल्ली, 9 जून (हिं.स.) : जम्मू इथले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या ट्वीट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले, “हे आपल्या परंपरेची समृद्धता साजरी करेल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक...
FlashNews:
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Temple of Hindu Deity Lord Narayan Dev in ruins!
All India Hindu Rashtra Convention – 24 – 30 June,2024 @ Goa!
PM Modi Arrives In Srinagar, Attends Programme At SKICC
Baramulla Encounter: Two Pakistani Terrorists Killed in Jammu and Kashmir
A Dozen plus temples, Schools, Local Jobs, Private Properties, Water Bodies, Houses, entire village: All Auctioned for Mining in Goa!
‘Nayi Soch Ki Sawaari’: Electric Mobility in Delhi new mantra for Delhi
Deadly Eid-Ul-Azha Eve: Roadside Blast In Central Kurram Kills Four, Security Forces Eliminate Five Terrorists.
EVM Hacking again becomes an issue on social media, debate hots up after Musk tweet
Goan Temple Restoration Project: Wait just gets a bit longer!
Dashbord Design: Considerations and Best Practices for MSME’s
Leading from the front: India’s Green Credit Program
Gaming Through Time Console Evolution
Wisdom of the Ages: Pune’s Educational Legacy
3ioNetra : Temple Management Platform
Category: इतर
गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे – रवींद्र चव्हाण
मुंबई, 8 जून (हिं.स.) : जनतेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अधिक व्यापक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. सार्वजनिक बांधकाम भवन येथे आयोजित बांधकाम विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांच्या...
छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक : राज्यपाल
मुंबई, 6 जून, (हिं.स.) लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे महानायक होते. परकीय शक्तींकडून असलेले धोके ओळखून त्यांनी सुरतेवर आक्रमण केले. शिवाजी महाराज आणखी २० वर्षे जगले असते तर भारताचा इतिहास पूर्ण वेगळा राहिला असता, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते...
अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेब, संभाजीराजेंना वंदन
मुंबई, ६ जून, (हिं.स) – शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन… राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन… स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना वंदन… स्वराज्यस्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करत सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक वंदन...
दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा
रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरू झालेल्या दाभोळ (ता. दापोली) येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यवस्थापनाकडे केली. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषण राणे यांनी केली. दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनी...
कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत
रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते....
हवामान संरक्षणासाठी प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार करावा – पंतप्रधान
नवी दिल्ली, 5 जून (हिं.स.) : जागतिक पातळीवर हवामान रक्षणासाठी जगातील प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, आधी स्वत:च्या देशाचा विकास करण्याबद्दल विचार करायचा आणि त्या नंतर...
शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
सातारा, 4 जून (हिं.स.) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे...
कुटुंबातील एक सदस्य अशी छाप उमटविणारी व्यक्ती काळाने हिरावून नेली – बावनकुळे
मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचनादीदी म्हणजे कुटुंबातीलच एक सदस्य अशी छाप मराठी मनावर उमटविणारी व्यक्ती! आजच्या सायंकाळी हे नाते काळाने हिरावून नेले. आई, बहीण, वहिनी, आत्या, मामी, मावशी अशी अनेक कौटुंबिक नाती त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ पडद्यावरच साकारली नाही, तर घराघरात निर्माण केली. आपल्या सोज्वळ दिसण्यासह सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आत्मीयता निर्माण केली. त्यांना राज्य...
सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार
नाशिक, ०३ जून (हिं.स.) : उल्हासनगर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी सिंधी समाजाच्या वतीने नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या २७ मे रोजी उल्हासनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...